माझ्या आत्महत्येला भाजपा-शिवसेना सरकार जबाबदार; चिठ्ठी लिहून शेतकर्‍याची आत्महत्या

Foto

यवतमाळ: नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळमधील शेतकर्‍याने आत्महत्या केली. शेतकर्‍याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपा-शिवसेना सरकारचा उल्लेख आहे. शेतकर्‍याने त्याच्या आत्महत्येयवतमाळच्या पांढरकवडामधील पहापळचे रहिवासी असलेल्या 52 वर्षीय धनराज बळीराम नव्हाते यांनी आत्महत्या केली. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मृतदेहाजवळ सापडली. यामध्ये त्यांनी त्यांच्या अवस्थेसाठी राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला जबाबदार धरले आहे. नव्हाते यांची 4 एकर शेती असून त्यांच्यावर सावकाराचे 2 लाखांचे कर्ज होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

गेल्या काही वर्षांमध्ये नापिकीमुळे धनराज यांचे शेतीत मोठे नुकसान झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली. नव्हाते बुधवारी सकाळी त्यांच्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांची मुलगी वणीला वास्तव्यास आहे. मात्र ते दुसर्‍या दिवशी घरी परतले नाहीत. यानंतर कुटुंबानं त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील खड्ड्यात सापडला. त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासानंतर समोर आले आहे.साठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. शेतकर्‍याने लिहिलेली चिठ्ठी मृतदेहाशेजारी आढळून आली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker